मध्यंतरी कार्यालयात ब्लोगर बंद झाल होता, म्हणुन काही पोष्ट टाकता आल्या नाहीत.. मागची एक पोष्ट बाकी होती ती टाकतो..
दि. १८ मार्च २००८
मी आणि आयुष्यावर बोलु काही
आयुष्यावर बोलु काही च्या ४०० व्या भागाला (जरा नाखुशीनेच) जाणं झालं. आतापर्यंत हा प्रयोग ५-६ वेळेस तरी बघितला आहे. पर्वाचा बोर नाही झाला. पण अगदिच अंगात पण भिनला नाही. नेहमी जसा भिनतो तसा. जेवण मात्र छान होतं ( अननस शिरा :) ) असो.
काही प्रीयजनांच्या आग्रहाला बळी पडून ४०० रु. घातले. एक मात्र खटकलं, मध्यांतरा नंतर काही लोकांनी ह्या कार्यक्रमाविषयी आपल्या भावना रंगमंच्यावर येउन बोलुन दाखवल्या. सगळे जणं मनापासुन दाद देत होते. अगदि एका मुलाने तर संदिपच्या कविता, त्याच्या आणि त्याच्या मित्रांमधला एकमेकांना धीर देण्याच्या प्रसंगात काशा वापरतो ते ऐकुन तर खरच मी हललो. त्याच्या भाषेवरुन तरी तोपण माझ्या सारखाच मराठवाड्यातुन आल्या सारखा वाटत होता. मला अगदि ३-४ वर्षापुर्विचा मी आठवलो. (जाउदे ते नंतरा कधी..) पण या दोघांच काही लक्ष नव्हतं, ते आपापसातच बोलण्यात गुंग होते. मला तरी वाटते, समोर बसलेल्या १००-२०० जणांपेक्षा त्या मुलाने दिलेली दाद खरिखुरी वाटली. थोडफार तरी ऍप्रिशिएट करायला पाहिजे होत ना त्यांनी. जाऊदे. :(
बाकी कार्यक्रम नेहमी सारखाच फर्मास.. विशेषतः "ये ये ना, ये ये ना, ये ना ये ये ना" :):)
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Tumhi mhanata tasach mala hi doghe tasech vatale..
Mi ekadach gelo tya show la...
tyanchya show madhe kharach maja asate... pan tyanchya cheharyavar nehami mi "Swa" mhanaje majhach khara, mich shreshtha asa bhav disala...
Khare kay te dev jaano.. pn hech chahatyanna khatakat...
Post a Comment