Monday, March 10, 2008

आहे मनोहर तरी..

सध्या "आहे मनोहर तरी" वाचतोय.. वाचायला घेण्या आधी वेगळ असं काहितरी वाचायला मिळेल अस वाटलं.. अर्थात ते तसं आहे खरं.. पण काय की मला नाही (भावलं) आवडलं.. म्हणजे त्या अगदि परखड लिहीतात, असं ऐकल होतं खरं, आणि ते थोड्या-फार प्रमाणात आहे.. म्हणजे मराठी साहित्यातल्या देवता विषयी लोकांना काही बोललेलं रुचणार नाही, ह्याची त्यांना पुरेपूर जाण असुनही त्यांनी परखड पणे सगळं लिहीलं आहे.. त्याबद्द्ल त्यांना नक्किच जितकी दाद द्यावी लागेल, त्यांच्या लेखनशेलीला पण तेवढीच..

पण मला मात्र त्यांच्या लेखना मध्ये थोडा एकसुरीपणा वाटला.. माझा पिंड.. माझा स्वभाव.. माझी काटकसर.. माझ्या कामाचा झपाटा..

आणि अजून एक, म्हणजे असं म्हणणं थोड धाडसच होइल.. अर्थात असं नसेलही कदाचित, पण मला असं जाणवल्याशिवाय राहवल नाही म्हणुन लिहीतो..

काही वेळेस त्यांच्या लिखाणातुन एक प्रकारची खंत जाणवते..

आहे मनोहर तरी.. कसली तरी खंत पण(???)

आपल्यातल्या गुणांची योग्य कदर न झाल्याची खंत असेल का? काय की..

सांगता नाही येणार.. अर्थात तस नसेलही, माझं हे एक वॅयक्तिक मतं..

Friday, March 7, 2008

राहत आणि आतिफ

हिन्दी गायक तसे बरेच आवडतात.. सगळेच बहुतेक.. अगदि हेमंत कुमार, मन्ना डे, रफी साब, किशोर दा पासुन सोनु, अभिजीत, उदित आणि शान पर्यंत.. अर्थातच काही अपवाद सोडुन.. (पण हिमेश किंवा मिका सारखे बोटावर मोजण्या इतकेच).. पण यांच्या पठडित न बसणारे, म्हणजे ज्यांचा आवाज रुढार्थाने कठल्याही अभिनेत्याला साजेसा होणार नाही, अशा काही व्याक्ति ईथे मुंबईच्या मायाविनगरीत आपले बस्तान मांडुन आहेत.. आणि सगळीच गाणी गाजवतायेत..

राहत फतेह अलि खान.. आणि आतिफ अस्लम.. :)

सध्या मी एकत असलेली यांची काही गाणी..

लागी मन की लगन..
जिया धडक धडक..
बोल ना हलके हलके..
जग सुना सुना लागे..
तेरे बिन..
दूरी..
मॅ एक दर्द हूं..
पेहली नजर मे..

Thursday, March 6, 2008

बोरकर


सध्या बा.भ. बोरकराच्यां या कवितेने मनात नुसता धुमाकुळ घातला आहे. आणि सलिल म्हणतो तसं, रोमान्टिझमचा कळस.. :)
आणि तो कसला खल्लास गातो.. अगदी एकताना डोळ्यात पाणीच येतं..


आयुष्याची आता, झाली उजवण, येतो तो तो क्षण, अमृताचा..
जे जे भेटे ते ते, दर्पणीचे बिंब, तुझे प्रतिबिंब लाडेगोडे..
सुखोत्सवे असा, जीव अनावर..
सुखोत्सवे असा, जीव अनावर,पिंजर्याचे दार उघडावे..

संधिप्रकाशात, अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोनी यावे..

असाविस पास, जसा स्वप्न भासं, जीव कासाविस झाल्या विना..
तेंव्हा सखे आणं, तुळशीचे पान, तुझ्या घरी वाण नाहि त्याची..
तुच ओढलेले, दे सवेचे पाणी, थोर ना त्याहूनी तिर्थ कोणी..
संधिप्रकाशात, अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोनी यावे..

वाळल्या ओठा दे, निरोपाचे फुल, भुलितली भुल शेवटची..
संधिप्रकाशात, अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोनी यावे..
:(