सध्या "आहे मनोहर तरी" वाचतोय.. वाचायला घेण्या आधी वेगळ असं काहितरी वाचायला मिळेल अस वाटलं.. अर्थात ते तसं आहे खरं.. पण काय की मला नाही (भावलं) आवडलं.. म्हणजे त्या अगदि परखड लिहीतात, असं ऐकल होतं खरं, आणि ते थोड्या-फार प्रमाणात आहे.. म्हणजे मराठी साहित्यातल्या देवता विषयी लोकांना काही बोललेलं रुचणार नाही, ह्याची त्यांना पुरेपूर जाण असुनही त्यांनी परखड पणे सगळं लिहीलं आहे.. त्याबद्द्ल त्यांना नक्किच जितकी दाद द्यावी लागेल, त्यांच्या लेखनशेलीला पण तेवढीच..
पण मला मात्र त्यांच्या लेखना मध्ये थोडा एकसुरीपणा वाटला.. माझा पिंड.. माझा स्वभाव.. माझी काटकसर.. माझ्या कामाचा झपाटा..
आणि अजून एक, म्हणजे असं म्हणणं थोड धाडसच होइल.. अर्थात असं नसेलही कदाचित, पण मला असं जाणवल्याशिवाय राहवल नाही म्हणुन लिहीतो..
काही वेळेस त्यांच्या लिखाणातुन एक प्रकारची खंत जाणवते..
आहे मनोहर तरी.. कसली तरी खंत पण(???)
आपल्यातल्या गुणांची योग्य कदर न झाल्याची खंत असेल का? काय की..
सांगता नाही येणार.. अर्थात तस नसेलही, माझं हे एक वॅयक्तिक मतं..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment