Thursday, March 6, 2008
बोरकर
सध्या बा.भ. बोरकराच्यां या कवितेने मनात नुसता धुमाकुळ घातला आहे. आणि सलिल म्हणतो तसं, रोमान्टिझमचा कळस.. :)
आणि तो कसला खल्लास गातो.. अगदी एकताना डोळ्यात पाणीच येतं..
आयुष्याची आता, झाली उजवण, येतो तो तो क्षण, अमृताचा..
जे जे भेटे ते ते, दर्पणीचे बिंब, तुझे प्रतिबिंब लाडेगोडे..
सुखोत्सवे असा, जीव अनावर..
सुखोत्सवे असा, जीव अनावर,पिंजर्याचे दार उघडावे..
संधिप्रकाशात, अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोनी यावे..
असाविस पास, जसा स्वप्न भासं, जीव कासाविस झाल्या विना..
तेंव्हा सखे आणं, तुळशीचे पान, तुझ्या घरी वाण नाहि त्याची..
तुच ओढलेले, दे सवेचे पाणी, थोर ना त्याहूनी तिर्थ कोणी..
संधिप्रकाशात, अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोनी यावे..
वाळल्या ओठा दे, निरोपाचे फुल, भुलितली भुल शेवटची..
संधिप्रकाशात, अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोनी यावे..
:(
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment